महाराष्ट्र 24 तास | बीड – दुर्दैवी घटना घडली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच युवकांना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस ने चिरडले यात तिघांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी बीड तालुक्यातील घोडका राजुरी जवळ घडली आहे.
आज दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी घडली. बीड – परभणी गाडीने हा अपघात झाला असून घोडका राजुरी येथीलच तिघा जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
परभणी कडे जाणाऱ्या या गाडी मुळे अपघात झाला असून सकाळी रनिंगची प्रॅक्टिस करणाऱ्या या मुलांना बसने धक्का दिला. यातील दोघांनी वेळीच उड्या मारल्याने ते बचावले मात्र तिघे अपघातात जागीच ठार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तिन्ही मयत मुलांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. यामध्ये सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे (वय २०), विराट बब्रूवान घोडके (१९), ओम सुग्रीव घोडके (२०) यांचा मयतामध्ये समावेश आहे. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे.
