महाराष्ट्र 24 तास | अंबाजोगाई – गोरगरीब रुग्णांवरील उपचारासाठी आधारस्थान असलेल्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयास बनावट औषधींचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे बनावट औषध रुग्णांना वितरित झाल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची बाब समोर आली आहे याप्रकरणी ठाणे आणि सुरत (गुजरात) मधील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे
सध्याच्या खाजगी रुग्णालयातून मिळणाऱ्या महागड्या उपचारपद्धतीमुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्ण स्वस्त आणि खात्रीपूर्वक उपचारासाठी स्वाराती रुग्णालयास प्राधान्य देतात. एका अर्थाने हे रुग्णालय गोरगरिबांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र या रुग्णालयात महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधीचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे. या प्रकरणी औषधी निरिक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश दत्तात्रय पाटील, मिहीर त्रिवेदी (रा. भिवंडी, जि.ठाणे),द्विती सुमित त्रिवेदी (रा. सुरत) आणि विजय शैलेद्र चौधरी (रा. मिरा रोड ठाणे) या चौघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या मागे आंतरराज्यीय टोळी असून अनेक राज्यात त्यांचे जाळे पसरले असण्याची शक्यता देखील फिर्यादीत व्यक्त करण्यात आली आहे. याप्रकरणी आंबेजोगाई पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
अधिक माहितीसाठी
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंदातीर्य वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला कोल्हापूरच्या ई-टेंडरद्वारे, एजन्सीकडून पुरवण्यात आलेली, अॅझिमसीम ५००० ही अॅझिथ्रोमायसिनची गोळी औषध विभागाच्या तपासणीत बनावट निघाली आहे. तब्बल वर्षभरानंतर तपासणीचा अहवाल प्राप्त झाला.. याप्रकरणी ४ जणांविरोधात अंबाजोगाई शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. या बनावट गोळ्यांची लिंक कोल्हापूर, भिवंडी, गुजरातमधून, ठाण्यापर्यंत आली आहे. ही गोळी घसा, कान, फुप्फुसाच्या संसर्गावर उपचारासाठी वापरली जाते. स्वाराती रुग्णालयातील अॅझिमसिम ५०० या गोळीचे नमुने, १० ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी तपासणीसाठी घेतले होते. मुंबईच्या प्रयोगशाळेकडून याचा तपासणी अहवाल एक वर्षानंतर, १८ ऑक्टोबर २०२४ रोजी मिळाला.. ई-टेंडरिंगद्वारे २५ हजार ९००० गोळ्यांचा पुरवठा कोल्हापूरच्या विशाल एंटरप्रायजेसने, २९ जुलै २०२३ रोजी केला होता. या एजन्सीकडे विचारणा केली असता, त्यांनी भिवंडी येथील अॅक्वेटिस बायोटेक एजन्सी व गुजरातमधील डिंडोली येथील मार्फासिक्स बायोटेक या दोन कंपन्यांकडून, २३ लाख १०० गोळ्यांची खरेदी केल्याची माहिती दिली. औषध विभागाने या ददेोन्ही कंपन्यांकडे माहिती मागितली, असता मार्फासिक्स बायोटेक या एजन्सीने, भिवंडीच्या अॅक्वेटिस एजन्सीकडून गोळ्यांची खरेदी केल्याचे सांगितले. तर, अॅक्वेटिस एजन्सीचे मिहिर त्रिवेदी यांनी ठाण्याच्या काबीज जेनरिक हाऊस या कंपनीकडून ५० लाख ५५ हजार गोळ्या खरेदी केल्याचे सांगितले.
कंपनीच अस्तित्वात नाही
काबीज जेनेरिक हाऊस विरोधात बनावट औषध पुरवठ्याबाबत यापूर्वी वर्धा व भिवंडी येथेही गुन्हा नोंद आहे. संचालक विजय चौधरीला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे.
आंतरराज्य टोळीचा यात समावेश असण्याची औषध विभागाला शंका आहे. ही कंपनीच दिलेल्या पत्त्यावर अस्तित्वात नसल्याचे समोर आले. कंपनीच्या मोबाइल क्रमांकावर औषध विभागाने नोटीस पाठवली होती. याचे उत्तर त्यांनी वकिलामार्फत व्हॉट्सअॅपवरच दिले असल्याची माहिती समोर येत आहे.
पंचवीस हजार टॅबलेट घेण्यात आल्या असल्याचे तसेच
ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही एफडीएलाही कळवला आहे औषधी घेणे बंद केलेला आहे ज्याच्याकडून हे औषध घेण्यात आलेले आहे त्याचं बिल देखील दिलं नाही त्याची चौकशी समिती देखील नेमणूक चौकशी सुरू असल्याचं देखील स्वराती रुग्णालयाचे अधिष्ठाता शंकर धपाटे यांनी सांगितलं
अण्णा भेसळ विभागाच्या वतीने काही रुटीन नमुने चेक करण्यात आले चेक केल्यानंतर भेसळ असल्याचं समजून आलं आणि त्यानंतर तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेण्यात आलेला आहे चार जनावर ती गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे यातील एक जण भिवंडी येथे अटकेत आहे तर वर्धा आणि इतर जिल्ह्यांमध्येही यांच्यावरती गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलय.. त्यामुळे यात जर अधिकचा तपास झाला तर बनावट औषधी विक्रेत्यांचा भांडाफोड होऊ शकतो
यांच्यावर गुन्हा दाखल
अंबाजोगाई शहर ठाण्यात कोल्हापूरच्या एजन्सीचा सुरेश पाटील, अॅक्वेटिस एजन्सीचा संचालक मिहिर त्रिवेदी (रा.भिवंडी), गुजरातच्या मार्फासिक्स बायोटेक कंपनीच्या संचालक द्विती त्रिवेदी, तसेच ठाण्याच्या काबीज जेनेरिक हाऊस कंपनीचा संचालक विजय चौधरी यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.
